जाता जाता हे वर्ष
खरच नाही कळलं की हे असं किती चटकन हो सरलं. हा संवाद नेहमीच आपण करतो. नव्याचं
स्वागत करताना आपण पटापट आपले संकल्प करायचे आणि काही काळात ते विसरायचे हे मागील
पानावरुन आयुष्य पुढे चालू ठेवल्यासारखंच आहे. का म्हणून आपण संकल्प करतो हे का
विचारावं. करावा आणि विसरावा हा एक सवयीचाच भाग झालाय इतकंच. आकड्यांचा हा सारा
खेळ. आपलं आयुष्य या आकड्यांशी जोडलं गेलय हे मात्र खरं.
पहिलं गेलं आणि दुसरं आलं.. काय दिलं
जाणा-यानं आणि नव्याने येणा-यानं काय आणलय आपल्या पोटलीत याचा विचार करीत झिंगत
रात्र काढायची सवय आता लागत आहे. ही रात्र का दारूत घालायची याचा विचार कोणीच करीत
नाही. होळीला बोंबा का मारायच्या हा सवाल कोणी कधी विचारलाय का. बोंब तर सारेच
मारतात तसा काहीसा हा प्रकार तर होत नाही ना असं वाटतं.
काळ तसा कुणासाठी थांबत नाही आणि थांबला तर
ते चालत नाही असं काहीसं मत माझा वर्धेतील मित्र दर्शन राऊत यानं काही वेगळ्या
शब्दात लिहीलय.
जिंदगी क्या है, एक काली नागीन
लमहा लमहा सरकती जाती है..
सोंचता हुं गर रुके तो प्यार करू
कंबख्त.. रूकती है तो काट खाती है..
हा विचार खुपच वेगळा
आहे. येणारा काळ देखील काही वेगळं घेऊन यावा ही नव्या वर्षाकडून अपेक्षा..
Wish you A Very Happy New Year 2012