Thursday 24 May 2012

बदलला तो गाव











त्याची ती आणि तिचाच का तो
सवाल मनामनात सलत राहतो..
ती त्याची एक आठवण होती
आठवणीतच तो वाहत गेला
दिस आला नि दिस तो गेला
आठवणींचा बहर वाढतच गेला
बालपणात मन फिरत गेलं
आठवणींच्या पावसात भिजत भिजत
ती शाळा ते अंगण आता नाही
नभातले तारे बघत बघत रोज
राक्षस नि राजकन्येच्या गोष्टी
दोस्ता आता मात्र नाहीत..
गाव गेलं अंगणही, गावचा गेला पार
विकास गंगेत पाराचा झाला बियर बार
बदललं सारं वदललं रे गाव..
म्हणूनच वाटत मित्रा आता त्याला
आठवणींच्या त्या गावातच जगावं...
प्रशांत दैठणकर