Friday 20 July 2012

वेग


काळचा वेग आपण पकडू शकत नाही मात्र जाणारा हा काळ आपण आपल्या चांगल्या कामांनी मनात आठवणींच्या रुपात नक्कीच साठवू शकतो. माणसं बदलतात आणि गाव देखील बदलतं आणि उरतात त्या आठवणी.
आपण अनेकदा याचा अर्थ काय आणि त्याचा अर्थ काय याबाबत मनातच वाद घालत बसतो. आपण हे समजून घ्यायला हवे की काही बाबी अपरिहार्य असतात. आपण विनाकारण विचार करुन त्रास करून घेत आहोत हे आपल्या लक्षात आले तर आपण तणावापासून मुक्त राहू शकतो. सारं काही आपल्या हाती असतं तर आपणास इतरांची गरज वाटली नसती. आपण आपापसात बोलू शकतो आणि आपला ताण हलका करु शकतो याची आपण जाणीव ठेवायला हवी.



भिजले ओले हे मन..

म्हणता शब्द ओलावले

मग आयुष्य झेलता उरी

डोळे नकळत पाणावले

सुख मागावे का कुणी

कुणी ते का द्यायचे

ठेविले अनंते रे गड्या

तसेच तू रे रहायचे...

क्षण आजचा क्षण आज का..

नाही मना रे विचारायचे..

जगतो जगी आनंद मानुनी..

का रे उगा उदास व्हायचे..

प्रशांत दैठणकर २०-०७-२०१२