Friday 29 June 2018

वक्त होता नही... निकालना पडता है

प्रसंग,
नायिका असलेल्या माधुरी दिक्षीतला मुद्दाम त्रास देण्याचा नायक अनिल कपूर याने मुन्ना ऊर्फ महेश देशमुख मंदाकिनीला म्हणतो ... वक्त होता नही है .. निकालना पडता है .. ! चित्रपट तेजाब . 

प्रसंग लक्षात राहण्याचं कारण म्हणजे वेळ ... हो अनेकदा अनेक प्रसंगी लोकं बोलतात .. मला ते करायची इच्छा आहे पण वेळच नाही मिळत ... अर्थात आपण खूप बिझी आहोत हे सांगायचं असतं , सतत कामात राहणं आणि वेळ नसणं यांचा काय संबंध आहे हे आपण जाणतोच माझ्या आईचं एक वाक्य मला आठवतं ... इतका कुठे बिझी की जेवायलाही वेळ नाही तुझ्याकडे , तू काय राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आहेस का.?

सांगायचं हेच की वेळ नसण्याची सबब सर्वजण पुढे करताना दिसतात आणि सबबीचा एक खास गुणधर्म आहे. सबब ही कायम लंगडी असते परंतु भारतात तीच अधिक चालते ...

एक रेल्वे ताशी 60 च्या वेगाने 20 मिनिटे धावली तर किती अंतर पूर्ण केले किंवा 6 माणसे एक घर 30 दिवसात बांधतात तेच घर 9 माणसे किती दिवसात पूर्ण करतील ... अशा पध्दतीची काळ - काम - वेगाची गणितं शाळेत असताना मला स्वत:ला आवडत होती कदाचित अनेकांना आवडत नसावीत प्रत्यक्षात आयुष्यात जगात वावरताना मात्र वेळं आणि त्याचं गणित सांभाळाव लागतं ते कुणालाच आवडत नाही हे स्पष्ट आहे . वेळ म्हटल्यावर अनेक पध्दतीने याचा विचार होतो मराठी भाषा लवचिक आहे त्यामुळे याबाबतीत अधिक रंजकता आपणास बघायला मिळले.


वेळ कधी सांगून येते का ? याचा अर्थ निराळा आणि '' अशी वेळ कुणावरही येवू नये '' याचा अर्थ निराळा '' काय वेळ आणली पोरानं ''.. याचा अर्थ वेगळा ... अशा प्रकारे जसं आपण बघतो . आयुष्याचं अभिन्न अंग म्हणून वेळ हे एकक आहे. प्रश्न आहे की आपण याबाबत गांभीर्य बाळगलं नाही तर वेळच तसच करायला आपल्याला लावत.

आपल्याला वेळ नाही ही सबब आपण इतरांना देवू शकतो मात्र आपण काही जणांना वेळ दिलाच पाहिजे असं माझं स्वत:चं मत आहे. आपण आयुष्यात कशाला प्राधान्य द्यायचं याचा निर्णय आपण प्रथम घ्यावा. प्राधान्यक्रम ठरवला म्हणजे वेळेचे व्यवस्थापन शक्य होत असते. यासोबतच काही सवयीत बदल करणे काही नव्याची सुरुवात करणे आदी बाबीतून आपण वेळेचे योग्य व्यवस्थापन करुन वेळ काढू शकतो, निश्चितपणाने वेळ काढता येतो .

आपण हे लक्षात घेतलं पाहिजे 50-100 कंपन्या चालवणारी व्यक्ती आणि आपण या दोघांनाही दिवसात सारखाच वेळ असतो. तुलनेत आपल्या मागे व्याप कमी असूनही आपण स्वत:साठी तसेच कुटुंबासाठी प्राधान्यक्रमाअभावी आहे.आता स्वत:साठी वेळ द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं असं विचाराल तर सांगता येईल आरोग्य प्रथम आपण रोज स्वत:च्या आरोग्यसाठी वेळ राखीव ठेवलाच पाहिजे. उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ...
अन्नाला आपण पूर्णब्रह्म म्हणतो त्याचे सेवन करताना स्थिर राहणे अपेक्षित असते. मी स्वत: जेवण करीत असताना माझी पत्नी किंवा माझी मुलं यांचा नंबर असेल तरच मोबाईल अटेन्ड करतो कारण मी घराबाहेर राहतो. दूर असतं कुटूंब . कुटुंबात असेल त्यावेळी तो प्रश्नच येत नाही. माझ्या कुटुंबात कुणीही जेवताना फोन उचलत नाही. आता मला सांगा तुम्ही सिनेमा गृहात जर फोन उचलत नाहीत तर जेवताना का उचलता. तिथं प्राधान्य त्या सिनेमाला देता ना.

जेवताना मोबाईलवर बोलणं म्हणजे स्वत:साठी वेळ न देणं होय असं मी मानतो. आम्ही शाळेत असताना मधल्या सुट्टीत काही जण डबा खात होते त्यावेळी आमचे मुख्याध्यापक द.रा.मेढेकर वर्गात आले. मुलं सर आले म्हणून उठून उभे राहिली. त्यावेळचं मेढेकर सरांच वाक्य होतं '' अरे बसा मुलांनो बसा , लक्षात ठेवा जेवताना राष्ट्रपती आले तरी जागेवर उठायचं नसतं.'' ते वाक्य शाळेतच मनावर कोरलं गेलं .. खरं आहे ते.

विवीध कार्यक्रमात एका हाताने जेवत दुस-या हाताने मोबाईल कानाला लावून अखंड बडबड करणारे अनेकजण आपणास दिसतील .. इतकं काय तातडीचं असतं ते
..
आपण आणि आपलं कुटुंब यांचा आपल्या वेळेवर पुर्ण हक्क आहे तो आपण मान्य केला पाहिजे. आपण जगतो कुणासाठी ? स्वत:साठी आणि कुटुंबासाठी तर सारी धावपळ आपण अहोरात्र करित असतो. आपला प्राधान्यक्रम इथून सुरु झाला म्हणजे आपल्या जगण्याला खरा अर्थ येईल.


आपली
खरी संपत्ती आरोग्य आहे या जाणिवेतून त्यासाठी वेळ द्या तो न दिल्यास आजारी पडाल, मग उपचार आणि दवाखाना यासाठी वेळ द्यावाच लागेल कारण शेवटी प्राधान्य त्याला प्राप्त होणार ... मग आधीच स्वत:ला वेळ देवून पुढचा वाया जाणारा वेळ आणि पैसा तुम्हाला वाचवता येईलच ना.

अनेक बाबतीत आपण पूर्वतयारी करुन मोठया प्रमाणावर वेळ वाचवू शकतो मग हा वाचवलेला वेळ आपण सत्कारणी कसा लावायचा याचाही निर्णय घेवू शकतो ... म्हणूनच म्हणतात ना वक्त होता नंही . . . निकालना पडता है ..

-- प्रशांत दैठणकर
9823199466

...............................
............................................

Thursday 28 June 2018

हर फिक्र को धुंएमे.....!


मन हां भी करता है और ना भी करता है. अशी स्थिती आज पुन्हा नव्यानं जाणवायला लागली आणि आठवण झाली. विल्यम शेक्सपिअरच्या टू. बी. और नॉट टू बी या प्रसिध्द वाक्याची..... करावं की नाही अशी स्थिती प्रत्येकाला रोज वेगवेगळया स्थितीत गाठते..... कदाचित निर्णय घेतला लवकर आणि चुकला तर मनस्ताप...... उशीर केला आणि चुकला तर मनस्ताप..... यानं बदलतो माणसाचा मूड..

आज प्रत्येक जण धावत....का आणि कशासाठी असं विचारुन आपण आपलं हसं का करुन घ्यावं..... कशासाठी पोटासाठी खंडाळयाच्या घाटात जाई...... हे बालगीत त्याचं उत्तर आहे.....काही अंशी तेच आहे पण त्याही पलिकडे काही कारणं आहेत ज्यासाठी प्रत्येकाची वेगळी धाव सुरु आहे.

मूड का बदलतो हे आपलं आपल्याला कळत नाही असं अनेकदा होत असतं पण आपला मूड बदलला हे समोरच्याला बघता क्षणी कळतं.....
त्यांनी जाणवून दिल्यावरच आपल्याला कळणार आहे का हा बदललेला मूङ..... तसंही नाही आपल्यालाही जाणवतंच की, उशिराने का होईना......

हा मूड या धावपळीचं फलीत आहे आणि त्याचं रुपांतर अनेकदा रक्तदाब, हृदय विकार आणि तत्सम बाबीत होतं मग आपण सावरण्याचा प्रयत्न करतो...... जगण्याची धडपड मनाचे मूड नियंत्रित करण्याचा प्रयत्न करायला लागतो.... पण जगात चंचल असणारं मन आपला हट्ट सोडत नाही. विक्रम-वेताळासारख्या गोष्टी प्रमाणे ते पुन्हा मूड बदलायला लागतं...... मग अधिकच वैताग व्हायला लागतो. मी मानसिक दोलायमानता जी स्थिती निर्माण करते ते हळूहळू असहय होवून जाते ज्याला आपण मानसिक ताण किंवा स्ट्रेस म्हणतो.

मानसिक ताण हा आजच्या जीवनशैलीचा एक घटक बनत आहे. यातून काही मार्ग निघेल का.... आहे ना मार्ग...
.स्थितप्रज्ञता हा मार्ग आहे.

Hypper होण्याची वृत्ती पाहून आजकालची पिढी ज्या भाषेत बोलते त्या भाषेत सांगायचं असेल तर म्हणावं लागेल Take a chill Pill. ... ओये ठंड रख....!

खरच मानसिक आंदोलन शांत करता येतील की नाही....... त्याचीही एक वेगळी चिंता.

आपल्याकडे माणूस आयुष्यात एकदाच धडधडून पेटतो..... तो फक्त सरणावर बाकी वेळा त्याचं परिस्थितीशी लढणं चालत राहतं. आपल्या मानसिक कुवत आणि ज्ञानाप्रमाणे आणि मग प्रत्यय येतो.
चिंता जाळी शरीर, चिंता जाळी मन
या उक्तीचा.... रोजच चिंता करणं म्हणजे रोज थोडं थोडं मरणं होय. ते टाळता आलं पाहिजे. सक्षम मन ही यशासाठीची गरज आहे. जे घडतय त्याला आपण काय आणि कशी प्रतिक्रिया देतो यावर आपल्या बाहय व्यक्तीत्वाचं रुप लोकांना दिसत..... मनात काय चालू आहे हे आपल्या स्वत:शिवाय कुणाला कळत नाही.

आत्मचिंतन आणि आत्मसंवाद उत्तम असेल तर समोर घडणाऱ्या प्रत्येक बाबतीत आपण क्षणात निर्णय घेऊ शकतो.
....
तो चुकला तरी तो आपण घेतलेला निर्णय आहे याचा अभिमान असेल तर मानसिक त्रास कमी होतो.

पौ बारा.... म्हणत आयुष्याचं प्रत्येक दान आपल्या पदरात पडण्याची अपेक्षा करायला आपण काही भारलेल्या कवडया वापरणारे कौरव आणि शकुनीमामा नाही.

मनासारखं घडलं तर आनंद वाटतो ना मग नेमकं मनाविरुध्द घडलं तर..... ठीक आहे..... होता है लाईफ मे अशी वृत्ती आपला ताण कमी करेल.

आपल्या स्वत:च्या क्षमतांची ओळख करुन घेणं अधिक महत्वाचं ते फक्त आत्मसंवादातूनच शक्य आहे.... क्षमता पुर्णपणे माहिती असतील तर ताण येत नाही.... जगात दोनच बाजू आहेत Yes or No. आपल्या क्षमतेत असेल तर आपण करु शकतो त्यात यश - अपयश याबाबत स्विकारण्याची तयारी असावी.

जी बाब क्षमतेबाहेत व इतरांवर किंवा परिस्थितीवर अवलंबून आहे ती बाब Yes झाली तर तो बोनस समजायचा. पण प्रयत्न जरुर करायचे. मनाची तयारी अगदी Try for the Best, Ready for the Worst अशी आहे. प्रश्न कर्माचा आहे, आपण कर्ते आहोत.

आयुष्यात यश मिळविणारे आणि अपयश पचवणारेच यशस्वी होतात. महत्वाकांक्षा आणि क्षमता यांची सांगड न घालता डोंगर उचलण्याचा प्रयत्न करुच नये.... मला याबाबत विचार करताना माही अर्थात कॅप्टन कूल एम.एस. धोनी नेहमी दिसतो....
. शांत.... अगदी शांत ... त्याच्या चेहऱ्यावर मनातल्या विचाराची आंदोलने खूप कमी वेळा आणि अगदी कमी प्रमाणात दिसतात त्यामुळे तो पुढे काय करणार याचा अंदाज येत नाही..... असं Unpredictable पणा यशाकडे नेतो हे साऱ्या जगानं बघितलय...

सांगायला सारे सांगतात. सकाळी व्हॉटस्ॲपवर अशा संदेशांचा पाऊस पडतो....
यह भी पल जायेगा..... मात्र संध्याकाळपर्यंत पडणाऱ्या पांचट विनोद आणि व्हिडिओचा पाऊस बघितल्यावर जाणवतं लोक तणावाखाली आहेत. तणावातला माणूसच जास्त शोधात राहतो. विनोदाच्या किमान काही क्षण तरी हसण्याची ही केविलवाणी धडपड असते.

हर फिक्र को धुएं में उडाता चला गया
मै जिंदगी का साथ निभाता गया...
...


अर्थात तणाव मुक्ती.... मूड जरुर बदलेल पण प्रतिक्रिया आणि सूर बदलला नाही पाहिजे. जगताना साधं जगलं पाहिजे. म्हणजे खूप काही करण्याची महत्वाकांक्षा विनाताण साध्य होते. अगदी हसत खेळत.....

---प्रशांत दैठणकर

9823199466

Tuesday 26 June 2018

मेरा पती मेरा देवता ...?

मी लहानपणापासून पुराणातल्या सात चिरंजीवी ची कथा ऐकत आलोय. त्यात सर्वांना प्रकर्षाने लक्षात राहतो तो अश्वस्थामा ...
तो देखील त्याच्या भाळावरल्या जखमेमुळे ... ती जखम घेऊन जगण अशक्य अशा स्थितीत त्याला अमरत्व दिल्याने त्याच्या त्या वेदना देखील युगानुयुगे सुरु आणि वेदनांना देखील मरण नाही... कसं असेल ते जगणं...

ही जखम आठवण्याचं कारण म्हणजे वटपौर्णिमा अर्थात वड पौर्णिमा ... ती सावित्री सत्यवानाचे प्राण परत आणण्यासाठी सृष्टीचा नियम बदलायला लागली आणि ते तिनं केलं.... पण आजच्या सावित्रींकडे मी बघतो तेंव्हा मला त्यांच्याही भाळावर ती जखम दिसायला लागते....!

पंरपरा कुठं सुरु झाली ठाऊक नाही... का करायची पूजा तर त्यामागे कथा आहे.... पण आजच्या सावित्रीच्या आयुष्यात असलेला व्यथेचं काय ? घरा घरात अशा सावित्रीच्या हो प्रत्येक सावित्रीच्या व्यथेचीच कथा आहे... तरी परंपरा सुरु आहे....

भला है बुरा है जैसा भी है मेरा पती मेरा देवता है.....!

हा देवता आहे ही मानून भारतीय नारी या जन्मीच्या साऱ्या वेदना उरात कवटाळत खरच मनापासून जन्मोजन्मी हाच पती मागत असतील का ? आणि लगेचच दुसरा सवाल का म्हणून मागावा. ती कलयुगातल्या सावित्रींची जखमही मग भळभळत रहाते... आपलं घरदार सोडून स्वत:चं अस्तित्व पूर्णपणे बदलून परक्या घरात आजची सावित्री येते... किती जणींना चांगली वागणूक मिळते .. कालपर्यंत न बघितलेला, त्याला सत्यवान मानायचं, त्याला देवाचं स्थान द्यायचं आणि पूजा करायची.


सतयुग केंव्हाच संपलं हे कलीयुग आहे. त्या सावित्रीचा तो सत्यवान होता... तुझा कोण आहे गं पती कलियुगात बेवडा, जुगारी, ....गुन्हेगार .... काही का असेना कुंकुवाचा धनी आहे म्हणतं त्याची पुजा करायची... त्याचं मानसिक व्यंग लपवायचं ..... कोण कसा हे सगळयांना कळत नाही म्हणूनच पत्नीला अर्धांगिनीचा दर्जा दिलाय. शब्दाने प्रत्यक्षात ती अर्धांगिनी असते का? त्याचं सारं खरेपण पोटात घालून समाजात त्याला चांगलं म्हणायचं... मेरा पती ....देवता म्हणायचं.

असं ऐकलं होतं कोणत्याही दगडाला शेंदूर पासून देव होत नाही... मुळात त्या दगडात देवपण असावं लागतं.

...सत्यवान किती आहेत आज म्हणून त्यांच्या सावित्रीनं जन्मोजन्मीची साथ मागायची ..... ती अबला आहे असं म्हणत पती-पत्नीच्या नात्यात बहुतेक कलयुगी सावित्री दुय्यम जिणं जगताहेत. Male dominant culture .. पुरुष प्रधान संस्कृती ... किती जणींना बरोबरीचा दर्जा मिळालाय आणि किती जणी केवळ.... अर्धांगिनीच्या ऐवजी अंगवस्त्र म्हणून बघितल्या जात आहेत... मग त्यांनी का म्हणायचं ... मेरा पती मेरा देवता ...?

सप्तपदीच्या प्रत्येक फेऱ्यात दिलेली वचनं ही समारंभाचा भाग आहेत का... आता तर विवाह समारंभ कमी आणि इव्हेंटच जास्त झालाय.. त्याचा फायदा घेत व्यावसायिक गणितं मांडत धुमधडाका केला जातो... DJ च्या गलक्यात कुठे ऐकू येतात ती सप्नपदीची वचने ....!

कलियुग ....घोर कलियुग ... सप्तपदीची पावलं देखील आज दारुच्या धुंदीत अडखळतच पडताना दिसतात... संसार कसा सरळ होणार नंतर...!

आपली भारतीच संस्कृती निश्चितपणे जगात सर्वात्तम आहे... ती टिकून आहे कारण इथं अर्ध्या समाजाला विवाहाच्या साखळदंडानं बांधून भिंतीला जखडलय संसार नावाच्या .... ही सक्तीची जन्मठेप आहे आणि त्या गुंगी गुडियाला बोलायला बंदी आहे... सक्ती आहे म्हणून अधिक प्रमाणात विवाहसंस्था टिकून आहे... विवाहसंस्था ही संस्कृती नव्हे.... स्त्री - पुरुष यांना समानपणे जगण्याचा अधिकार ही संस्कृती आहे.... ती विसर्जित करुन घराघरात कलयुगातली ती घरची मालकीण (?)….!


घे उंच भरारी घे.... मुक्तपणे आयुष्य जग असं सांगताना घरात 'पिंजरा' आणून ठेवणारे कमी नाहीत... आणि हा पिंजरा ... दोन्ही अर्थानं.... मग तो सत्यवान तर नक्की नाही पण ... परंपरा....!

होळीला मी बोंब मारतो, का मारतो .. माहिती नाही....! पूर्वापार चालत आलय... परंपरा.... !

त्याला सत्यवान बनता आलं नाही पण त्याला सत्यवान मानत ती सावित्री पुन्हा निघते वडाच्या त्या झाडाला रेशम धाग्यांचे गुंफण घालून साता जन्माची साथ मागायला ....

मला मात्र भळभळणारी जखम आणि तळमळणारी मनं दिसत राहतात... !

- प्रशांत दैठणकर

9823199466

Monday 25 June 2018

Love@First Sight


आकर्षण ही बाब अशी आहे की, त्याला कोणतीही कारणमिमांसा लागू पडत नाही.....सांगायचं कारण म्हणजे 'ती ' हो आता ही ती कोण ? प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग येतो मात्र काही जणं टाळतात., काही जणं सहन होत नाही आणि सांगता येत नाही या स्थितीत वावरतात......काहींच्या मनात समाजाची भिती यानेकी बागुलबूवा असतो....
.आपण मात्र व्यक्त होतो अगदी मोकळेपणानं असं मला जाणवलं....

म्हणतात ना 'आरशासमोर खोटं बोलता येत नाही ' अर्थात हे सत्य असलं तरी स्वत:लाच फसवणारे इथं बहुसंख्येने आहेत, ते जर स्वत:ला खरं सांगत नसतील तर जगाला काय सांगतील ? असं चित्र दिसतं....

मीच नव्हे तर सर्वच मानतात की, आकर्षण हे नैसर्गिक,त्याला नाकारणं म्हणजे भावनीक कोंडमारा करुन घेणं म्हणता येईल. आकर्षण असणं आणि प्रत्यक्षात त्याचा लाभ होणं यासाठी सकारात्मक विचार असायला हवे.

मध्यंतरी 'सिक्रेट' नावाच्या पुस्तकाचं फॅड आलं होतं. त्यातूनच प्रेरणा घेत शाहरुखच्या तोंडी '..... शिद्दतसे...... कायनात........ ' असा भला मोठा उपदेश टाकला गेला. पण तो प्रत्यक्षात किती जणांनी अनुभवला..... देखल्या देवा......
म्हणत आमची स्वप्नं पुर्ण झाली असे सांगणे चुकीचे असले तरी बहुतेक जण ही चूक करतात. आकर्षण असलं की मन स्वप्नाळू होतं..... त्यात नकारात्मकता आली तर ते विध्वंसक देखील ठरु शकतं...... पण ते ही चालतं.

जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी 'ती ' दिसायला लागते त्यावेळी समजायचं ते आकर्षणच आहे . जे नसलेल्या गोष्टीत आपलं रुप दाखवून मनाला स्वप्नं बघायला लावतं.... काही सावरतात.... काही घाबरतात तर काही आवरतं घेतात.... खऱ्या आकर्षणातून (कबूल करा की न करा ) मन झुरायला लागतं.

जगाची सुरुवातच मुळी आकर्षणातून झाली. ईव्ह आणि ॲडम आणि ते आकर्षण..... पडलेल्या सफरचंदाचं..... जग बरच प्रगत झालं आणि पुन्हा एकदा सफरचंद पडलं.....ते न्यूटनच्या माथ्यावर. त्यातून लागला शोध गुरुत्वाकर्षणाचा.... ते देखील आकर्षणच आहे..... 20 व्या शतकाच्या अखेरीस तुकडा मिसिंग असणारं सफरचंद बाजारात पडलं (खऱ्या अर्थानं) म्हणून आकर्षण थांबलं नाही... आज 'ॲपल' चं आकर्षण आहेच साऱ्या जगाला.

खरेदी करण्याची कुवत नाही पण आकर्षण आहे अशा स्थितीत असणारे कमी उत्पन्न असणारे चाहते आकर्षण मान्य न करता मनातल्या मनात झुरतात हे नक्की.... आकर्षण.... वेळ निघून गेल्यानंतरचं खूप वेगळं. पदरी पडलं पवित्र झालं म्हणत तिनं याला सांभाळायचं. आणि तूच माझी मिस युनिव्हर्स म्हणत आपण आनंदी आहोत असं दाखवायचं..... मनातली 'ती ' काही जात नाही..... मजबुरीच हो बाकी काही नाही.... पण मनातलं आकर्षण मनात रहातं अन्ं मन आतल्या आत झुरत राहतं.....

आता वयाच्या चाळीशीनंतर 'ती ' बघायची तरी कशाला ? याचं उत्तर आकर्षण..... ती आणि मी भेट फक्त दोनदा. एकदा फक्त तोंड ओळख आणि दुसऱ्या भेटीत परिचय...... काय असतं आवडण्यासारखं हे मनाला विचारावं तर कारण शोधूनही सापडत नाही..... आवडतं याला देखील आकर्षणाप्रमाणेच कारणमिमांसा नाही.

दुकानात खरेदीला गेल्यावर तीन-तीन तास बसून ये दिखाव, वो दिखावो, वो भी दिखावो असं करणाऱ्यांना विचारा ..... आवडणं हा मुळ मुद्दा असतो..... पहिल्यांदा बघताच आवडलं पाहिजे असं वाटत राहतं.... समोर एक आणि मनात एक कॉम्बिनेशन होत नाही. तुलना सुरु.....शॉपिंग सुरु..... कारण आकर्षण....

असं म्हणतात Love at First sight...... ते खरं आहे.... आकर्षणातूनच प्रेम जडतं. चाळीशी उलटल्यावर प्रगल्भता अधिक आलेली असते. यामुळे या पुढील काळात सख्ये मित्र जमवणं शक्यच होत नाही. मात्र Love at First sight चा निसर्ग नियम चुकत नाही.

माणूस हा निसर्गात आहे.... त्याला मन आहे... मनात भावना आहेत.... भावना आहेत तोवर शब्द आहेत....शब्द आहेत तोवर व्यक्त करता येतं.....करायचं कबूल की दडवून, दडपून जगायचं हा ज्याचा त्याचा सवाल आहे....
                                              आखिर जिंदगी है आपकी.... दिल भी आपका.....


 प्रशांत दैठणकर
9823199466


मानसशास्त्रात याचं उत्तम विवेचन करण्यात आलय. त्यातून आपल्याला अधिक खुलासा होईल

Love at first sight: Is it possible? Do people really meet and in moments simply know they're meant to be? New evidence suggests that yes, they do.
The idea is wonderfully romantic: Two strangers see each other "across a crowded room," there's an instant attraction, an electric spark, and suddenly they've found their match and never look back. In a world where dating often requires a lot of work — work that comes with disappointment, rejection, and uncertainty — falling in love at first sight has strong appeal.
People say it happens all the time. If you start with personal testaments, love at first sight seems like the real deal. Prince Harry reportedly experienced it, saying he knew Meghan Markle was the one for him the "very first time we met" (BBC interview).
The kind of qualities that are known to reflect love — intimacy, commitment, passion — are not particularly strong in those first moments when people say they've fallen in love at first sight. At least, these emotions are not experienced to the same degree as they are by people in established relationships. The extent to which people in relationships report feeling intimacy and commitment and passion toward their partners far exceeds reports of these emotions by people who experience love at first sight. Yet the love-at-first-sight experience appears open to these emotions to a greater extent than first meetings where love at first sight is not reported.
In sum, the science favors the romantics. Love at first sight actually is experienced by people, but it's not so much "love" or "passion," Instead, it's a strong pull or attraction that makes someone particularly open to the possibilities of a relationship (Zsoks et al., 2017).
Love at first sight can happen multiple times, and maybe the instances where it fizzles or simple never translates into a relationship are forgotten. But when love at first sight does launch a sustained relationship, the story is a great one.
Naumann, E. (2004). Love at first sight: The stories and science behind instant attraction. Sourcebooks, Inc..
Zsok, F., Haucke, M., De Wit, C. Y., & Barelds, D. P. (2017). What kind of love is love at first sight? An empirical investigation. Personal Relationships, 24, 869-885.