Friday 27 March 2020

LOCKDOWN...! #Stay_Home_Stay_Safe

आयुष्य एक प्रकारे Pause वर आलय अशी काहीशी स्थिती या Lockdown ने आज आणली आहे. मी खूप Busy म्हणणा-या ( की दाखवणा-या ) सा-यांसाठी हा काळ नक्कीच विचार करायला लावणारा आहे. हीच संधी आहे माझ्यातला मी पणा बाजूला ठेवून मी नेमका काय हे शोधण्याची.. आत्मचिंतनाची.. Urgent काय आणि काय नाही याचा परिचय देणारा हा काळ आहे..खूप Urgent आहे असे म्हणणारे आज त्याचेच विडंबन करताना आपणास दिसतील.. एक प्रकारे हे आव्हान आपणास जाणून आपले स्थान या जगात नेमकेपणाने काय आहे याचाही बोध होईल. जान है तो जहान है हे मात्र खरं.

काळाच्या ओघात धावत राहणा-यांना आता जाणवत असेल की आपण जगायला विसरलो होतो.. असं म्हणतात की मरणाची भिती असेल तर जगण्याचं महत्व कळतं... समाज माध्यमांवर होत असणारे अनेकांचे खुलासे तर हेच दाखला देत आहेत की... ते जगणं किती नाटकी होतं.. योगायोगाने आज जागतिक रंगभूमी दिन आहे.. जिंदगी जिंदादिली का नाम है .. मुर्दादिल क्या खाक जिया करते है हे कोणाशा चित्रपटातलं वाक्य या निमित्तानं आठवलं.. जगण्यावर मंथन करण्याची एक संधीच जणू आज म़ृत्यूच्या भितीने सर्वांना दिली आहे.

बाबू मोशाय...
हम तो रंगमंच की कठपुतलीया है.. जिसकी डोर उपरवालेके हाथोंमें है ... कब कौन कहां उठ जाय ये किसी को नही पता... राजेश खन्नाचा तो गाजलेला संवाद... आणि त्याच चित्रपटाचा रिफाईन रिमेक असणारा कल हो ना हो... त्यातही तेच .. हर पल यहां जी भर जियो.. . आपल्या विचारांना यातून चित्रपट बघताना जे जाणवलं होतं ते आज प्रत्यक्षात अनुभवण्याचा हा काळ आहे असं मला वाटतं.. आयुष्याची क्षणभंगुरता एकप्रकारे यातून दिसते आणि घराघरात बसलेली प्रत्येक व्यक्ती ते अनुभवते आहे याची मला या क्षणी खात्री आहे.. यावर टिंगल टवाळी करणारे व्हिडीओ त्याची साक्ष देतात .. अति हतबलता आणि असहाय्यता विनोदाला जवळ करते.. यासाठीच आपण विनोदाचा आसरा घेतला की नाही हे प्रत्येकाने आपल्याच मनात डोकावून आपल्यालाच विचारावं...

अनेक जण छंद म्हणून प्राणी पाळतात ..
त्यांना मिरवतात देखील पण सतत एकाच ठिकाणी अडकून राहणं म्हणजे काय याचा देखील अनुभव याच काळात अनेकांना येणार आहे. आपल्याकडे भूतदया हा शब्द मराठीत आहे त्याचा अर्थ दया असाच आहे .. कैद असा नाही याचा अनेकांना बोध करून देणारा हा काळ ठरणार आहे याची प्रचिती एक दोन मित्रांच्या संवादातून मिळाली आहे आतापर्य़ंत...

आयुष्य म्हणजे खळाळतात प्रवाह असतो.... नदी वाहत राहते आणि सागरास मिळते ते आयुष्य असतं... ती संथावते पण प्रवाहीत असते. आणि हा प्रवाह एकाच जागी स्थिरावला तर त्याचा डोह होतो... आणि सारंच खुटत जातं.. आज या Lockdown च्या निमित्ताने त्या स्थिरावण्याचाही अनुभव याच काळात येणार आहे.. पण सुदैव हेच की हा ब्रेक खूप छोटा आहे आणि आयुष्य खूप मोठं.. आपण जगलो तरच पुढचं जग दिसेल या जाणिवेतून काही काळ ब्रेक भेटला आहे तर त्याचा आत्ममंथनासाठी वापर करून आपण नव्याने जगण्यासाठी तयारी करायला पाहिजे.. उगाच घराबाहेर पडण्याचं धा़डस आपणासाठी आणि समाजासाठी ही धोक्याचं आहे.. जपा ..

दगदग होते असं आपण नेहमी सागंतो .. धकाधकीचं आयुष्य आहे असंही सांगतो.. क्षणाची उसंत न घेता धावत राहतो.. यात प्रवासात आपण किमान तास दोन तास रिकामे असतो मात्र त्यावेळी आपलं मन जगाचा मागोवा घेत असतं त्यामुळे त्या वेळेचा सकारात्मक उपयोग न होता आपण ताण वाढवत असतो .. आता ना धावपळ ना दगदग सारं काही निवांत .. यात निसर्गाचं रूप बघा त्याची साद ऐकून त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा.. आपल्या कुटुंबासाठी काही ‍Quality Time मिळालाय या जाणीवेतून त्यांना वेळ द्या.. खूप चांगलं वाटेल.. नाही त्याचं स्वप्न बघणं  विसरून आहे ते #Njoy करा...

जिंदगी ..इक पहेली भी है...


प्रशांत दैठणकर

9823199466