जाणाऱ्या दशकानं काय दिलं आणि काय उरलं याचा विचार करण्याचा हा काळ आहे. आयुष्याचा जमा खर्च मांडताना आपण मुळातच आर्थिक अंगाने या सर्वांकडे बघतो असं वाटतं.. भावनिक पसारा किती वाढला.. आपण तो किती मांडला आणि सावरला याचाही विचार या निमित्त्तानं व्हायला हवा.
.. बंध आणि बंधन हा एक आगळा पैलू या मावळत्या दशकाचा
अपने जब रुठते है तो कोई कारण होता है
रुठने वालोंको मनाना जरुरी है
हा जरुर मनाना चाहिये
पर कुछ रिश्ते फिर भी रुठे रहते है
दशकाची आणि जन्माची कहाणी याचप्रकारे पुढे सरकत असते.
रुसणे आणि त्यातून प्रेम व्यक्त करणे हा आपणा सर्वांचा स्वभाव गुण आहे. पण त्यात काही कळ होते हे कळलं पाहिजे.. प्रत्येक वेदनेवर काळच औषध...!
झटपट सरणारा काळ आपणाला सारं काही सहन करायला शिकवतो... विसर पडत नाही म्हणून आठवण येत नाही पण आतली वेदना थांबत नाही. काळानं हे शिकवलं जे संत आधीच सांगून गेलेले आहेत पण संत वचन कळतं पण वळत नाही कारण त्याला अनुभवाची जोड नसते.. अनुभवातून शहाणपण येतं आणि त्यातूनच श्रध्दा और सबुरी कळते हे देखील तितकच खरं.
या दशकानं काय दिलय असा विचार करताना लक्षात येते की, औरंगाबादला केंद्रस्थानी ठेवून मी गडचिरोलीच्या घनदाट जंगलापासून मुंबईच्या दाटीने वाढलेल्या सिमेंटच्या जंगलांपर्यंत प्रवास केला. दशकाची सुरुवात क्रांतीभूमी वर्धेतून झाली..अख्खा विदर्भ पाठ झाल्यानंतर दशकाच्या शेवटच्या वर्षात कोकणकडा सह्याद्री अशा सफरीवरुन आता रत्नागिरीत फेसाळल्या समुद्राच्या लाटांवर विसावलोय.
सागर.. मनाच दुसरं रुप.. भावनेच्या लाटा किनाऱ्यावर येत राहतात आदळतात आणि परत जातात म्हणतात सागर आपलं किनाऱ्यावरच प्रेम इथं व्यक्त करतो.. प्रत्येक वाट वेगळी आणि भावनांचंही तसंच काहीसं असतं त्या भावना सांभाळत रहायचं आणि काय..
या दशकाचा विचार करताना जाणवलं की काळ अतिशय गतीने बदलत आहे.. तंत्र बदलायला वेळ लागत नाही पण ते शिकायला आणि आत्मसात करीत त्यावर राज्य करायला मेहनत घ्यावी लागते. फार काही सोपं नाही हे.. एका बाजूस काळ सरकतो तर दुस-या बाजूस आपलं वय वाढत असतं आणि त्यानुसार शरिराच्या हालचालीत फरक व्हायला लागतो..
अशा काळात आपण आपल्यात एक लहानपण जपायचं असतं..
अशा काळात आपण आपल्यात एक लहानपण जपायचं असतं..
घरात तारूण्यात जाणा-या पिढीसोबत आपणही नव्याने तरुण व्हायचं.. मनाने आपण अभी तो मै जवान हूँ असं नुसतं गाणं म्हणून फरक पडत नाही तर आपणास त्यासाठी त्याच पद्धतीने जगायलाही लागतं
जिंदी हर कदम इक नई जंग... चला आता लढा ...
खळाळत्या समुद्रासारखं चैतन्य बाळगायचं ते जगण्याचं साधन आणि तेच आराधन ... भावानांचा कल्लोळ कधीही सरणारा नसतो.. तो सरणावरच सरतो म्हणून काय जगण्याचा आनंद नाही घ्यायचा...?..
खळाळत्या समुद्रासारखं चैतन्य बाळगायचं ते जगण्याचं साधन आणि तेच आराधन ... भावानांचा कल्लोळ कधीही सरणारा नसतो.. तो सरणावरच सरतो म्हणून काय जगण्याचा आनंद नाही घ्यायचा...?..
Life you get once .. Live it Fullest.. Live Happily.. Live For FAMILY.. Live for The World.. Live For Yourself.. Life you get only Once.... Remind Each Morning. Lot of Happiness is here..
भावनांचं काय कधी भरती तर.... कधी ओहोटी हेच ....आयुष्य. आपण फक्त नितळ रहायचं पाण्यासारखं आणि गुणगुणत रहायचं.
पानी रे पानी तेरा रंग कैसा...!
जिसमें मिल दाे... हो जाये उस जैसा..!
पानी रे पानी तेरा रंग कैसा...!
जिसमें मिल दाे... हो जाये उस जैसा..!
Hat's off to the life and bye to the leaving Decade
प्रशांत दैठणकर
9823199466