तुम तो ठहरें परदेसी . . . साथ क्या निभाओगे..
अल्ताफ राजाचं
गाणं रिक्षावाल्याने लावलं होत . . त्यानं झटकन मीटर टाकून त्या रिक्षाला वेग दिला . . . रिक्षा वेगानं समोर धावत होती पण मनाचा प्रवास नेमका उलटया दिशेने सुरु झाला होता. शासकीय सेवेत येण्यापूर्वीचा तो काळ . . मी चित्रपट समिक्षा लिहायचो.
शुक्रवारचा फर्स्ट डे फर्स्ट शो . . . जागा बूक असायची आज इतक्या वर्षांनी तब्बल वीस वर्षांनी हो . .. चित्रपटाच्या भाषेत सांगायचं तर 20 साल बाद . . तो काळ आठवताना आजची त्या काळाशी तुलना आपसूकच सुरु झाली मनातल्या मनात. . !
मला आठवलं माझं औरगाबाद आठवलं. . .
काय वेगाने सरत असतो. . . आपलं शहर हे आपल्या घराइतकंच प्रिय असतं, आता हा बऱ्यापैकी भावनिक विचार झाला ज्या शहरात लहानाचे मोठे झालो त्या शहराची आठवण प्रत्येकाच्या मनात घर करुन असते. . बदलत्या काळात माझं औरगाबाद सोडून बाहेर रहावं लागलं. . फरक असता प्रत्येक गावात . . . !
इथं गडचिरोलीत बरोबर आज 22 जूलैला येवून 3 वर्षे पूर्ण झाली . . . एक प्रकारे मी गडचिरोलीचाच झालोय इथली भाषा . . बोलायला लागलो . . नव्या व्यक्तीला वाटतं की मी गडचिरोलीचाच आहे. . पण संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची प्रतिक्रिया मात्र अगदी अल्ताफ राजाच्या गाण्यासारखीच असते..
. . . तूम तो ठहरे परदेसी . . . !
आपल्या शहरात आपण राहतो त्यावेळी आसपास मित्रमंडळी आणि परिचितांमुळे कधी एकटं . राहण्याचा प्रसंग आला नाही त्यामुळे एकाकीपणा देखील आला नाही असा अनुभव येतो. . . इथं देखील मित्रमंडळी जमली पण राहायला एकटं रहावं लागतं. . . सततच्या एकटेपणानं एकाकीपणा येवू नये यासाठी खूप काळजी घ्यावी लागते मनाला. . . !
घर सोडून राहणारा मी काही जगात एकटा नाही . . . दर्यावर्दी सिंदबादच्या सफरी लहानपणी वाचलेल्या त्यातली रंतकता आठवायची . .
एखादा नवा छंद जोपासायचा आपण स्वत:लाच गुंतवून ठेवायचं . . शरिरानं इथं.... मनानं तिथं... असं न करता शरीर आणि मन दोन्हीसह जाता आणि जगता आलं तर तिथं राहणं अवघड असलं तरी ते अशक्य मात्र नाही . . . अगदी तसं जगलं तरच छानपैकी जगता येतं हा अनुभव .
9 वर्षांपूर्वी औरंगाबाद सुटलं त्यावेळी मी पूर्ण पणे औरंगाबादचा होतो नंतर प्रथम वर्धेत जाऊन मी पूर्णपणे वर्धेकर झालो. मराठवाडी भाषा आणि वऱ्हाडातली भाषा यात खूप फरक आहे. तो अवघ्या 15 दिवसात आत्मसात करण्याचं आव्हान घेतलं आणि तिथं जिंकलो . . . त्या 3 वर्षांनंतर पुढची 3 वर्षे बुलडाणा आणि आता गडचिरोली एकटे पणाची मजा वेगळी . . घर आणि गडचिरोली यातील प्रवासाची कथा आगळी . . मला स्वत:ला प्रवास करायला आवडत नाही पण करना पडता है. . . ! या प्रवासाच्या कालावधीत जिथं जाऊ तिथला होवू अशी मनाची तयारी आपोआप होत असते. .... तशी झाली देखील.
आपण कितीही इथले म्हणून राहिलो तरी स्थानिकांच्या मनात असलेलं ' आपलं
' परेदसीपण ' विचार करायला लावतं. . . आज ना उद्या तुम्ही जाणार ही भावना त्यांच्या मनात असल्याने म्हणावी तशी ' Attatchmont कुणी ठेवत नाही . .. हा प्रकार काहीसा रेनकोट घालून शॉवर खाली अंघोळ करण्यासारखा असतो म्हणायला पाण्याच्या धारांमध्ये तासभर उभे पण आतून आपण कोरडेच राहतो. . . हे कोरडेपण जाणवत रहातं... !
कधी कधी भावनेच्या भरात होमसीक होतो हे पण मान्य करावं लागेल अखेर आपण अन्नपाण्यापेक्षा भावनांवर अधिक जगतो ना... ! अशा वेळी जर एखांद आठवणीतलं गाण लागलं तर डोळेही पाणावतात .
चिठ्ठी आयी है वतनसे चिठ्ठी . . . !
असो की
संदेसे आते है . . . !
खरोखरच हम तो ठहरे परदेसी......... या वेगळया जगात......!
गाणं रिक्षावाल्याने लावलं होत . . त्यानं झटकन मीटर टाकून त्या रिक्षाला वेग दिला . . . रिक्षा वेगानं समोर धावत होती पण मनाचा प्रवास नेमका उलटया दिशेने सुरु झाला होता. शासकीय सेवेत येण्यापूर्वीचा तो काळ . . मी चित्रपट समिक्षा लिहायचो.
शुक्रवारचा फर्स्ट डे फर्स्ट शो . . . जागा बूक असायची आज इतक्या वर्षांनी तब्बल वीस वर्षांनी हो . .. चित्रपटाच्या भाषेत सांगायचं तर 20 साल बाद . . तो काळ आठवताना आजची त्या काळाशी तुलना आपसूकच सुरु झाली मनातल्या मनात. . !
मला आठवलं माझं औरगाबाद आठवलं. . .
काय वेगाने सरत असतो. . . आपलं शहर हे आपल्या घराइतकंच प्रिय असतं, आता हा बऱ्यापैकी भावनिक विचार झाला ज्या शहरात लहानाचे मोठे झालो त्या शहराची आठवण प्रत्येकाच्या मनात घर करुन असते. . बदलत्या काळात माझं औरगाबाद सोडून बाहेर रहावं लागलं. . फरक असता प्रत्येक गावात . . . !
इथं गडचिरोलीत बरोबर आज 22 जूलैला येवून 3 वर्षे पूर्ण झाली . . . एक प्रकारे मी गडचिरोलीचाच झालोय इथली भाषा . . बोलायला लागलो . . नव्या व्यक्तीला वाटतं की मी गडचिरोलीचाच आहे. . पण संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची प्रतिक्रिया मात्र अगदी अल्ताफ राजाच्या गाण्यासारखीच असते..
. . . तूम तो ठहरे परदेसी . . . !
आपल्या शहरात आपण राहतो त्यावेळी आसपास मित्रमंडळी आणि परिचितांमुळे कधी एकटं . राहण्याचा प्रसंग आला नाही त्यामुळे एकाकीपणा देखील आला नाही असा अनुभव येतो. . . इथं देखील मित्रमंडळी जमली पण राहायला एकटं रहावं लागतं. . . सततच्या एकटेपणानं एकाकीपणा येवू नये यासाठी खूप काळजी घ्यावी लागते मनाला. . . !
घर सोडून राहणारा मी काही जगात एकटा नाही . . . दर्यावर्दी सिंदबादच्या सफरी लहानपणी वाचलेल्या त्यातली रंतकता आठवायची . .
एखादा नवा छंद जोपासायचा आपण स्वत:लाच गुंतवून ठेवायचं . . शरिरानं इथं.... मनानं तिथं... असं न करता शरीर आणि मन दोन्हीसह जाता आणि जगता आलं तर तिथं राहणं अवघड असलं तरी ते अशक्य मात्र नाही . . . अगदी तसं जगलं तरच छानपैकी जगता येतं हा अनुभव .
9 वर्षांपूर्वी औरंगाबाद सुटलं त्यावेळी मी पूर्ण पणे औरंगाबादचा होतो नंतर प्रथम वर्धेत जाऊन मी पूर्णपणे वर्धेकर झालो. मराठवाडी भाषा आणि वऱ्हाडातली भाषा यात खूप फरक आहे. तो अवघ्या 15 दिवसात आत्मसात करण्याचं आव्हान घेतलं आणि तिथं जिंकलो . . . त्या 3 वर्षांनंतर पुढची 3 वर्षे बुलडाणा आणि आता गडचिरोली एकटे पणाची मजा वेगळी . . घर आणि गडचिरोली यातील प्रवासाची कथा आगळी . . मला स्वत:ला प्रवास करायला आवडत नाही पण करना पडता है. . . ! या प्रवासाच्या कालावधीत जिथं जाऊ तिथला होवू अशी मनाची तयारी आपोआप होत असते. .... तशी झाली देखील.
आपण कितीही इथले म्हणून राहिलो तरी स्थानिकांच्या मनात असलेलं ' आपलं
' परेदसीपण ' विचार करायला लावतं. . . आज ना उद्या तुम्ही जाणार ही भावना त्यांच्या मनात असल्याने म्हणावी तशी ' Attatchmont कुणी ठेवत नाही . .. हा प्रकार काहीसा रेनकोट घालून शॉवर खाली अंघोळ करण्यासारखा असतो म्हणायला पाण्याच्या धारांमध्ये तासभर उभे पण आतून आपण कोरडेच राहतो. . . हे कोरडेपण जाणवत रहातं... !
कधी कधी भावनेच्या भरात होमसीक होतो हे पण मान्य करावं लागेल अखेर आपण अन्नपाण्यापेक्षा भावनांवर अधिक जगतो ना... ! अशा वेळी जर एखांद आठवणीतलं गाण लागलं तर डोळेही पाणावतात .
चिठ्ठी आयी है वतनसे चिठ्ठी . . . !
असो की
संदेसे आते है . . . !
गाण्याच्या एका लकेरीत भावनांचा पसारा घरभर सांडतो. मग आपणच तो आवरायला घ्यायचा..... पण त्यातून झटकन निघता येत नाही हे देखील खरं आहे.
मी काय काय Miss केलय आजवर याचं गणित खर्चाच्या बाजूला मांडायचं
आणि मला काय काय जगायला मिळालं याची बेरीज जमेच्या बाजूला मांडायची..... या जमाखर्चात जमा कमी आणि खर्च अधिक असं होवू द्यायचं असेल तर सकारात्मक विचार ठेवून आला क्षण आनंदाने जगायचा.....!
आयुष्य ही वाटचाल आहे......मग सकारात्मक रहाण्यासाठी मन तयार करायचं....! यासाठी मराठीतील थोरांच्या सल्याचा आधार घ्यायचा....
' जे होतं ते चांगल्यासाठी '...... म्हणत वाटचाल करीत रहायचं...... काही जणांना मी गंमतीनं म्हणतो की, ' ठेविले अनंते तैसेची रहावे ' हे वाक्य माझ्यासाठीच आहे..... कारण माझ्या वडिलांचे नाव अनंत आहे.
घरापासून दूर राहणारे माझे अनेक मित्र आहेत. अगदी साता समुद्रापार म्हणतात त्या प्रमाणे ब्रिटन, दुबई, जर्मनी, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया, मेक्कीको, चीन कुठे नाहीत जगाच्या कानाकोपऱ्यात ..... त्यांनाही घर आठवत असणारच... ते तर माझ्यापेक्षा किती दूर आहेत घरापासून......!
आपल्याकडे जन्मभूमी आणि कर्मभूमी असे शब्द आहेत. जन्मभूमीची ओढ असणं स्वाभाविक आहे. कर्मभूमीवर देखील प्रेम असणं आवश्यक आहे..... जुन्या काळात प्रवासाची साधनं मर्यादीत होती आणि प्रवास कठीण......खलाशी ज्या बंदरात जायचे तिथं घर करायचेच ना.....!
कोणतीही व्यक्ती असो एक गोष्ट मात्र नक्की.
...... यह भी वक्त जायेगा......!
जणू काही पॉझिटीव्हीटीची इन्जेक्शन्स घेतोय असं वाटून जातं कधी कधी...... पण गडचिरोलीत मी वेगळं आयुष्य जगतोय....... सुंदर निसर्ग...... स्वच्छ पर्यावरण.... 24 तास शुध्द प्राणवायू आणि ..... 'परदेसी' पण मनाच्या कोपऱ्यात ठाण मांडून बसलेलं असतानाही आपलेपणानं जपणारे मित्र........!
गडचिरोलीची स्वत:ची अशी गती आहे. सुविधा कमी.... मनोरंजन शुन्य.... मुंबई-पुण्यासारखी धावाधाव दगदग नाही..... शांत संथ प्रवाह असणार गाव..... याला शहर देखील म्हणता येणार नाही.... मुंबईच्या भौतिकवादी जगापेक्षा दुर असणारा हा भारतातला वेगळा भारत......
मनाची गती कमी करुन आपणही शांतपणे 3 वर्ष इथ पुर्ण केली.... भरपूर रिकाम वेळ आत्मचिंतन...... आत्मबोध..... मनाचा शोध याच्या जोडीला जोपासलेला फोटोग्राफीचा छंद... खूप काही वेगळेपणानं करायला मिळालं.. जगायला देखील मिळालं साऱ्यामध्ये वेळ कसा गेला.... काळ कसा संपला हे कळलच नाही.....!
पण सत्य ते सत्य ते बदलत नाही.. काळाचे काही देणे हाेते आणि या ठिकाणी येणे होते... काळ झपाट्याने कसा जातो ते कळत नाही कारण आपण त्याचा वेग जाणून जुळवूम घेतलेले आहे याची जाणीव आहे... आता हा काळ वेगाने गेला त्याचंही कारण अगदी नेमकेपणाने तेच आहे.
सवय झाली इथल्या असण्याची... इथल्या रूटीनचा ... पण आज अचानक या गाण्याने आठवण दिली.
मी काय काय Miss केलय आजवर याचं गणित खर्चाच्या बाजूला मांडायचं
आणि मला काय काय जगायला मिळालं याची बेरीज जमेच्या बाजूला मांडायची..... या जमाखर्चात जमा कमी आणि खर्च अधिक असं होवू द्यायचं असेल तर सकारात्मक विचार ठेवून आला क्षण आनंदाने जगायचा.....!
आयुष्य ही वाटचाल आहे......मग सकारात्मक रहाण्यासाठी मन तयार करायचं....! यासाठी मराठीतील थोरांच्या सल्याचा आधार घ्यायचा....
' जे होतं ते चांगल्यासाठी '...... म्हणत वाटचाल करीत रहायचं...... काही जणांना मी गंमतीनं म्हणतो की, ' ठेविले अनंते तैसेची रहावे ' हे वाक्य माझ्यासाठीच आहे..... कारण माझ्या वडिलांचे नाव अनंत आहे.
घरापासून दूर राहणारे माझे अनेक मित्र आहेत. अगदी साता समुद्रापार म्हणतात त्या प्रमाणे ब्रिटन, दुबई, जर्मनी, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया, मेक्कीको, चीन कुठे नाहीत जगाच्या कानाकोपऱ्यात ..... त्यांनाही घर आठवत असणारच... ते तर माझ्यापेक्षा किती दूर आहेत घरापासून......!
आपल्याकडे जन्मभूमी आणि कर्मभूमी असे शब्द आहेत. जन्मभूमीची ओढ असणं स्वाभाविक आहे. कर्मभूमीवर देखील प्रेम असणं आवश्यक आहे..... जुन्या काळात प्रवासाची साधनं मर्यादीत होती आणि प्रवास कठीण......खलाशी ज्या बंदरात जायचे तिथं घर करायचेच ना.....!
कोणतीही व्यक्ती असो एक गोष्ट मात्र नक्की.
...... यह भी वक्त जायेगा......!
जणू काही पॉझिटीव्हीटीची इन्जेक्शन्स घेतोय असं वाटून जातं कधी कधी...... पण गडचिरोलीत मी वेगळं आयुष्य जगतोय....... सुंदर निसर्ग...... स्वच्छ पर्यावरण.... 24 तास शुध्द प्राणवायू आणि ..... 'परदेसी' पण मनाच्या कोपऱ्यात ठाण मांडून बसलेलं असतानाही आपलेपणानं जपणारे मित्र........!
गडचिरोलीची स्वत:ची अशी गती आहे. सुविधा कमी.... मनोरंजन शुन्य.... मुंबई-पुण्यासारखी धावाधाव दगदग नाही..... शांत संथ प्रवाह असणार गाव..... याला शहर देखील म्हणता येणार नाही.... मुंबईच्या भौतिकवादी जगापेक्षा दुर असणारा हा भारतातला वेगळा भारत......
मनाची गती कमी करुन आपणही शांतपणे 3 वर्ष इथ पुर्ण केली.... भरपूर रिकाम वेळ आत्मचिंतन...... आत्मबोध..... मनाचा शोध याच्या जोडीला जोपासलेला फोटोग्राफीचा छंद... खूप काही वेगळेपणानं करायला मिळालं.. जगायला देखील मिळालं साऱ्यामध्ये वेळ कसा गेला.... काळ कसा संपला हे कळलच नाही.....!
पण सत्य ते सत्य ते बदलत नाही.. काळाचे काही देणे हाेते आणि या ठिकाणी येणे होते... काळ झपाट्याने कसा जातो ते कळत नाही कारण आपण त्याचा वेग जाणून जुळवूम घेतलेले आहे याची जाणीव आहे... आता हा काळ वेगाने गेला त्याचंही कारण अगदी नेमकेपणाने तेच आहे.
सवय झाली इथल्या असण्याची... इथल्या रूटीनचा ... पण आज अचानक या गाण्याने आठवण दिली.
खरोखरच हम तो ठहरे परदेसी......... या वेगळया जगात......!
प्रशांत दैठणकर
9823199466
16 comments:
Excellent
Excellent..u love peace, nature, forest,rain,etc all you experienced n enjoyed just because of your strenght of writer n philosophy..
Ye wakt bhi jayega
खूप छान लिहिलय ... आपलं गाव ...माणसं ..याची आठवण छान झाली आहे ... लिहीत राहावे ...हार्दिक शुभेच्छा ...यशवंत भंडारे
Khupach Chan !!!
प्रशांत , छान लिहिले आहे.
सर, खूपच छान शब्दबद्ध केले आहे.....
खूपच छान , सर
गडचिरोली जिल्हा विशेष बद्दल मी एक पुस्तक लिहीत आहे सर, तर मला तुमचा मार्गदर्शन पाहिजे सर
Thanks prabhakar
धन्यवाद... सतत लिहिण्यासाठी प्रयत्न aahet.
Thanks ..
Surely
Few attachments need not require Ctr+Alt+Del. Let the recycle bin flowing with lots of memory files
Anirudha Ashtaputre
उत्तम लिहिलंय,
Yes Boss
Post a Comment