Friday 20 July 2018

पत्नी.. पती आणि ... ती


ती मला  पाहिजे . . .ती तुम्हालाही पाहिजे . . .  ती इथं सर्वांनाच पाहिजे . . . काळाच्या वेगात धावण्याचा प्रयत्न सारेच करतात, ही धावपळ जितकी वाढते तितक्य अधिक तिव्रतेने तिची गरज सर्वांना भासते.

लग्न मग ते प्रेमविवाह कॅटेगरीतलं असो की जुळवलेल . . . मधुचंद्राचा काळ संपून आयुष्यात रोजच्या गाडयाला जोडून घेतलं आणि नंतर सुरु झालं ते ' रुटीन ' यातून ...कधी कधी जवळ येणं . . . अधून . . मधून रुसवे , फुगवे . .. आयुष्य चालत राहतं अशा स्थितीत होणारी दगदग ज्यावेळी वैतागाकडे वळते त्यावेळी मात्र जाणवतं की आपल्याला
'ती ' आवश्यक आहे.

और दिल में . . ये बात इधर भी है ...और उधर भी..!

बंधन म्हणजे एक प्रकारे यमक जुळवणं असतं प्रत्येकाला यमकात जुळवणं जमतं असं नाही आणि मुक्त छंदातली मजा यमकात कुठे. . . शाळेत होतो त्यावेळी योग्य तो समास सोडून लिहावं असं सांगितलं जायचं . . आणि आपण त्याचे पालन करायचो. मात्र आयुष्यात तो प्रकार कधीच आवडला नाही. बंधन तसंही कुणाला आवडतच नाही ना.

प्रेमात पडलो. . . विवाह झाला पण काही काळानं ' ती ' हवी असं वाटायला लागलं . . . का वाटायला लागलं याचा आरंभी बोध झाला नाही पण नंतर जाणवलं. . . मलाच नव्हे तर तिलाही ' ती ' हवी आहे . . .

पती -पत्नी म्हणून सुरेख नाते जपले . . आजही खंत आहे की या नात्यात इतक्या वर्षांमध्ये दोघांनी भांडायचं राहूनच गेलं. . . परंतु दोघांनाही ' ती ' हवी असं वाटायला लागलं, त्याची स्पष्ट जाणीव झाली .
. . पती-पत्नी और वह अर्थात ती  . . म्हणजे ' पर्सनल स्पेस '  हो प्रत्येकातील स्व जपणारी ती  ' पर्सनल स्पेस '

' इंजाजत ' चित्रपटात एक सुंदर डायलॉग आहे.

शादी मरती है तो रिश्ता सडने लगता है . .!

खरच आहे. लग्न करावं की नाहि यावर प्रत्येक व्यक्तीचं स्वतंत्र मत आहे.मात्र लग्न न करणारे खूप कमी आढळतात

शादी वो लडडू है
जो खाये वो पछताये
 ना खाये वो भी पछताये . .!


लग्न मनाविरुध्द झालं तर समजण्यासारखं आहे पण प्रेम करुन विवाह बंधनात अडकणाऱ्यांचं असं का होतं . .? . . या प्रश्नातच याचं उत्तर आहे. . विवाह हे एक बंधन आहे . .
. विवाह झाल्यावर अनेक बदल दोघांच्याही आयुष्यात येतात.

मला विचाराल तर मला एक विनोद आठवला यावरला . .
लग्नापूर्वी आणि लग्नानंतर काय फरक पडला आयुष्यात . . .?
लग्नापूर्वी पलंगाच्या दोन्ही बाजूंनी उतरता येत होतं . . .!

यातला विनोदाचा भाग वगळला तर हे खरं आहे की , विवाह झाल्यावर दोघांचही आयुष्य बदलतं . .!

विवाहपूर्वीची प्रेमाची गुलाबी वाटचाल तिथं नसते . . . पुरुष प्रधान संस्कृतीत जगणारे आपण आणि आपल्या समाजाने पाळलेल्या परंपरा यामुळे आपणही नकळतपणे पतीच्या भुमिकेत शिरतो त्याच वेळी ती प्रेयसीच्या भुमिकेतून पत्नीच्या भुमिकेत जाते त्यावेळी तिची विचार करण्याची पध्दत बदलते . . !

टेढा है . . . पर मेरा है अशी एक जाहिरात आली होती तसं काहीसं ती आपल्या पतीला मानत असते त्यातच पतीला परमेश्वर मानणारा आपला समाज आसपास असतो.. आपण तारूण्यातला बेफिकरपणा सोडावा असं मत ती व्यक्त करीत असते आपल्यालाही तिथं काही बंधन आलय असं वाटायला लागतं.
... तिच्या अपेक्षा वाढत असतात आणि आक्षेप देखील... या अपेक्षा आणि आक्षेपातील गोंधळामुळे ताणाचे प्रसंगही वाढतात मग तो आणि तिचं प्रेम यात काही काळातं अंतर पडायला लागतं

लग्नाच्या वेळी असणारं प्रेम दोन्ही बाजूंनी एक धुसर रेषा ओलांडून प्रभुत्ववादाकडे कधी जातं ते कळत नाही मग त्यातून प्रेमाचं असलं तरी नातं हे बंधन होवून जातं . . . माझी बायको माझ्या शब्दाबाहेर नाही असा पुरुषी अंहकार जागा झाल्यावर मग Taken For Granted अर्थात गृहित धरण्याचा प्रकार सुरु होतो आणि यातून प्रभुत्ववादाची जाणीव होवून ' घुसमट सुरु होते.

पती आणि पत्नी यांच्यात स्पर्धा नसली तरी व्यक्तीमत्वात असणारा आक्रमकपणा मग वर्चस्वात रुपांतरीत होतो . . . दोघे समसमान असणं शक्य नाही त्यामुळे दोघांपैकी एक Dominate करतं आणि दुसऱ्याची त्यात घुसमट होते . . . अशा वेळी समोरच्या व्यक्तीला ' स्व' आहे त्याचा आदर करणं दूर राहतं मग ' तिची ' गरज जाणवते अगदीच आदर्शवादी न होता समाजात डोळसपणे बघावं मग आपल्याला जाणवेल . . . घरोघरी मातीच्या चुली !
प्रत्येकाला ' पर्सनल स्पेस ' हवी असते ती प्रत्येकाला मिळेलच असं नाही . . . . प्रेमात पडून विवाह झालेल्यांमध्ये वर्चस्वाची लढाई आणि पर्सनल स्पेस ची जाणीव यामुळे आगळा प्रसंग निर्माण होतो . . . यात समंजसपणे एकमेकांना पर्सनल स्पेस देणं.. समोर च्या व्यक्तीचा एक व्यक्ती म्हणून आदर करणं जिथं जमत नाही तिथं . . .

शादी मरने के बाद , रिश्ता सडने लगता है . . . यातून मग मार्ग घटस्फोटाचा ... !

साधारणपणे प्रेमविवाह केल्यानंतर ' ही पर्सनल स्पेस नाही म्हणून सर्वाधिक घटस्फोट होतात तुलनेत पारंपरिक जुळवणी करुन झालेले विवाह टिकतात असं दिसतं . . . इथं पुरुषी वर्चस्वातून ' पर्सनल स्पेस ' वर अतिक्रमण होतं आणि आयुष्य असंच आहे . .. आपलं नशीब म्हणत स्वत:मधील ' स्व ' ला पार गाडून टाकण्यांच काम भारतीय नारी करते.. म्हणून विवाह संस्था मजबूत आहे असं माझं मत आहे....

ला ईलाज को क्या ईलाज या उक्तीप्रमाणे... त्या पूर्ण कुटुंबाच्या लेखी येणाऱ्या विवाहितेने सप्तपदीच्या वेळी होणाऱ्या होमात आपल्या ' स्व ' ची पर्सनल स्पेसची आहुती दिलेली असते . . . !

व्यक्तीला व्यक्ती म्हणून नाकारणं चुकीचं आहे परंतु आपल्यकडे हा प्रकार सर्रास होतो . . .नातं टिकलं पाहिजे हे ठिक आहे पण त्यासाठी पर्सनल स्पेस' ची आहुती देणं म्हणजे गुलामगिरीच आहे . . !
पण लक्ष कोण देतो... या न्यायानं पर्सनल स्पेस सर्रासपणे नाकारली जाते ही अत्यंत वाईट बाब आहे.

... मै तूम में समा जाऊं

तूम मुझमे समा जाओ

ही समर्पणाची भावना प्रेम करताना सांगायला आणि गायला चांगली असते जगताना मात्र याचा त्रास होतो . . . पुरुषी अहं पायी स्वत:च अस्तिव संपवून बसलेल्या अनेक जणींना समाजात बघतो त्यावेळी राहवत नाही . . . स्त्रिया देखील घर सुटलं तर पुढं काय . . ना नोकरी . . त्यातून झालेल्या अपत्यांची चिंता . . .
अपरिहार्य होवून जातं सार..... त्याच वेळी ज्यांना पर्सनल स्पेस मिळतचं नाही अशांना जगणं विसरुन मरेपर्यंत जिवंत राहणं ... ! जगत राहणं . . . वेदना देखील होतात.

किमान माझ्या आयुष्यात ही पर्सनल स्पेस मी माझ्या घरात प्रत्येकाला देवू शकलो याचं खूप मोठं समाधान वाटत राहते . .

प्रशांत दैठणकर

9823199466

1 comment:

Anirudha Ashtaputre said...

छान लिहिलंस
लग्नाची बेडी त्यासाठीच म्हणतात. तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं