Friday 29 June 2018

वक्त होता नही... निकालना पडता है

प्रसंग,
नायिका असलेल्या माधुरी दिक्षीतला मुद्दाम त्रास देण्याचा नायक अनिल कपूर याने मुन्ना ऊर्फ महेश देशमुख मंदाकिनीला म्हणतो ... वक्त होता नही है .. निकालना पडता है .. ! चित्रपट तेजाब . 

प्रसंग लक्षात राहण्याचं कारण म्हणजे वेळ ... हो अनेकदा अनेक प्रसंगी लोकं बोलतात .. मला ते करायची इच्छा आहे पण वेळच नाही मिळत ... अर्थात आपण खूप बिझी आहोत हे सांगायचं असतं , सतत कामात राहणं आणि वेळ नसणं यांचा काय संबंध आहे हे आपण जाणतोच माझ्या आईचं एक वाक्य मला आठवतं ... इतका कुठे बिझी की जेवायलाही वेळ नाही तुझ्याकडे , तू काय राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आहेस का.?

सांगायचं हेच की वेळ नसण्याची सबब सर्वजण पुढे करताना दिसतात आणि सबबीचा एक खास गुणधर्म आहे. सबब ही कायम लंगडी असते परंतु भारतात तीच अधिक चालते ...

एक रेल्वे ताशी 60 च्या वेगाने 20 मिनिटे धावली तर किती अंतर पूर्ण केले किंवा 6 माणसे एक घर 30 दिवसात बांधतात तेच घर 9 माणसे किती दिवसात पूर्ण करतील ... अशा पध्दतीची काळ - काम - वेगाची गणितं शाळेत असताना मला स्वत:ला आवडत होती कदाचित अनेकांना आवडत नसावीत प्रत्यक्षात आयुष्यात जगात वावरताना मात्र वेळं आणि त्याचं गणित सांभाळाव लागतं ते कुणालाच आवडत नाही हे स्पष्ट आहे . वेळ म्हटल्यावर अनेक पध्दतीने याचा विचार होतो मराठी भाषा लवचिक आहे त्यामुळे याबाबतीत अधिक रंजकता आपणास बघायला मिळले.


वेळ कधी सांगून येते का ? याचा अर्थ निराळा आणि '' अशी वेळ कुणावरही येवू नये '' याचा अर्थ निराळा '' काय वेळ आणली पोरानं ''.. याचा अर्थ वेगळा ... अशा प्रकारे जसं आपण बघतो . आयुष्याचं अभिन्न अंग म्हणून वेळ हे एकक आहे. प्रश्न आहे की आपण याबाबत गांभीर्य बाळगलं नाही तर वेळच तसच करायला आपल्याला लावत.

आपल्याला वेळ नाही ही सबब आपण इतरांना देवू शकतो मात्र आपण काही जणांना वेळ दिलाच पाहिजे असं माझं स्वत:चं मत आहे. आपण आयुष्यात कशाला प्राधान्य द्यायचं याचा निर्णय आपण प्रथम घ्यावा. प्राधान्यक्रम ठरवला म्हणजे वेळेचे व्यवस्थापन शक्य होत असते. यासोबतच काही सवयीत बदल करणे काही नव्याची सुरुवात करणे आदी बाबीतून आपण वेळेचे योग्य व्यवस्थापन करुन वेळ काढू शकतो, निश्चितपणाने वेळ काढता येतो .

आपण हे लक्षात घेतलं पाहिजे 50-100 कंपन्या चालवणारी व्यक्ती आणि आपण या दोघांनाही दिवसात सारखाच वेळ असतो. तुलनेत आपल्या मागे व्याप कमी असूनही आपण स्वत:साठी तसेच कुटुंबासाठी प्राधान्यक्रमाअभावी आहे.आता स्वत:साठी वेळ द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं असं विचाराल तर सांगता येईल आरोग्य प्रथम आपण रोज स्वत:च्या आरोग्यसाठी वेळ राखीव ठेवलाच पाहिजे. उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ...
अन्नाला आपण पूर्णब्रह्म म्हणतो त्याचे सेवन करताना स्थिर राहणे अपेक्षित असते. मी स्वत: जेवण करीत असताना माझी पत्नी किंवा माझी मुलं यांचा नंबर असेल तरच मोबाईल अटेन्ड करतो कारण मी घराबाहेर राहतो. दूर असतं कुटूंब . कुटुंबात असेल त्यावेळी तो प्रश्नच येत नाही. माझ्या कुटुंबात कुणीही जेवताना फोन उचलत नाही. आता मला सांगा तुम्ही सिनेमा गृहात जर फोन उचलत नाहीत तर जेवताना का उचलता. तिथं प्राधान्य त्या सिनेमाला देता ना.

जेवताना मोबाईलवर बोलणं म्हणजे स्वत:साठी वेळ न देणं होय असं मी मानतो. आम्ही शाळेत असताना मधल्या सुट्टीत काही जण डबा खात होते त्यावेळी आमचे मुख्याध्यापक द.रा.मेढेकर वर्गात आले. मुलं सर आले म्हणून उठून उभे राहिली. त्यावेळचं मेढेकर सरांच वाक्य होतं '' अरे बसा मुलांनो बसा , लक्षात ठेवा जेवताना राष्ट्रपती आले तरी जागेवर उठायचं नसतं.'' ते वाक्य शाळेतच मनावर कोरलं गेलं .. खरं आहे ते.

विवीध कार्यक्रमात एका हाताने जेवत दुस-या हाताने मोबाईल कानाला लावून अखंड बडबड करणारे अनेकजण आपणास दिसतील .. इतकं काय तातडीचं असतं ते
..
आपण आणि आपलं कुटुंब यांचा आपल्या वेळेवर पुर्ण हक्क आहे तो आपण मान्य केला पाहिजे. आपण जगतो कुणासाठी ? स्वत:साठी आणि कुटुंबासाठी तर सारी धावपळ आपण अहोरात्र करित असतो. आपला प्राधान्यक्रम इथून सुरु झाला म्हणजे आपल्या जगण्याला खरा अर्थ येईल.


आपली
खरी संपत्ती आरोग्य आहे या जाणिवेतून त्यासाठी वेळ द्या तो न दिल्यास आजारी पडाल, मग उपचार आणि दवाखाना यासाठी वेळ द्यावाच लागेल कारण शेवटी प्राधान्य त्याला प्राप्त होणार ... मग आधीच स्वत:ला वेळ देवून पुढचा वाया जाणारा वेळ आणि पैसा तुम्हाला वाचवता येईलच ना.

अनेक बाबतीत आपण पूर्वतयारी करुन मोठया प्रमाणावर वेळ वाचवू शकतो मग हा वाचवलेला वेळ आपण सत्कारणी कसा लावायचा याचाही निर्णय घेवू शकतो ... म्हणूनच म्हणतात ना वक्त होता नंही . . . निकालना पडता है ..

-- प्रशांत दैठणकर
9823199466

...............................
............................................

8 comments:

Unknown said...

Very nice article
वेळात वेळ काढुन लिहल्याबद्दल धन्यवाद

chilwant mukund said...

सर खूप छान

Unknown said...

Nice one

TERRIOR said...

सर मस्त आहे लेख.विचार करायला लावणारा.

Unknown said...

सुंदर

Prashant Anant Daithankar said...

Thank you

Prashant Anant Daithankar said...

Thanks yaar

Prashant Anant Daithankar said...

Thanks