Monday 27 June 2011

फॅड त्या स्मार्ट फोनचं... !

सध्याचा काळा मोबाईलचा काळ आहे. प्रत्येकाच्या हातात या मोबाईलच्या रुपानं एक जग जसं आलय तसंच एक नवं फॅशन स्टेटमेंट समोर आलय ब्लॅक अॅड व्हाईट मोबाईल वापरणारे बी.पी.एल. तर ब्ल्यूटूथ (निलदंत), वाय-फाय, इंटरनेट सुविधा न वापरणारे लोअर मिडल क्लास त्याच्या वरील रेंजचे फोन वापरणारे मिडल क्लास आणि स्मार्टफोन आयफोन वापरणारे म्हणजे व्ही.आय.पी. अशी नवी वर्ण व्यवस्था या मोबाईलने निर्माण केलीय असं म्हणायला हरकत नाही.
हे मोबाईल वेड मर्यादेपलीकडे जाताना आपणास दिसत आहे. याचं अस्तित्व म्हणजे आपलं अस्तित्व अशी मानसिकता या यंत्राने निर्माण केली आहे. साधारण 15 वर्षांपूर्वी घरी फोन असणं म्हणजे प्रतिष्ठा होती आता सारं चित्रच बदललं आहे.
साधारण 24-25 वर्षाचा एक युवक मोबाईलवर मान वाकडी करुन बोलत गाडी चालवत होता कही दिवसांपूर्वी औरंगाबादेत घडलेला हा किस्सा आहे.रस्त्यात खड्डा आला. गाडी नियंत्रणात ठेवणे त्या मुलाला जमले नाही गाडी पडली. तो एका बाजूला मोबाईल दुस-या बाजूला पडला त्याला उचलायला धावत त्याच्यापर्यंत गेलो तोवर तो उठला होता. त्याने उठून प्रथम मोबाईल उचलला 'सॉरी यार मोबाईल गिर गया था' त्याचं बोलणं चालू याला काय म्हणणार आपण. हा प्रकार शुध्द वेडेपणा नाही तर काय.
मोबाईलच्या तंत्रातजशी प्रगती होत आहे तसं हे वेड अधिकच वाढत आहे. एसएमएस अर्थात शॉर्ट मेसेजिंग सर्व्हीस जे सध्या धुामकुळ घातलाय मोबाईल वर तासनतास चॅट करणा-या युवा पिढीनं इंग्रजी भाषा नव्या पध्दतीने लिहायला सुरुवात केली आहे. ही भाषा कधी कधी कळणं अवघड जातं इतका बदल या मोबाईलमुळे झालाय.
बॅक बेरी कंपनीने आपली सेवा देताना ई-मेलला प्राधान्य दिलं त्यामुळे त्याची गरज असणारा वर्ग त्याकडे वळतोय हे कळल्यावर आता सर्वच कंपन्यांनी आपली उत्पादने ई-मेल सुविधेसह बाजारात उतरविली नंतर आलेल्या 3 जी ने सर्वच क्रांती करुन टाकलीय काही दिवसात आणखी काही नवे बदल येवू घातले आहेत ते देखील विलक्षण असेच आहेत.
दोन दिवस जंगल भ्रमंती करताना तिथला शांतपणा अनुभवताना मोबाईल नाही म्हटलं की काही चुकल्यासारख वाटत राहतं मोबाईलचं हे वेळ येणा-या सुविधांमुळे निश्चितपणे चांगलं नाही
-प्रशांत दैठणकर
0000000

No comments: