Monday 27 June 2011

मेरा लाखोंका सावन.....


पाऊस म्हटलं की तो आभाळातूनच पडतो असं नाही भाव भावनांचा पाऊस डोळयांमधून पडतो आणि त्याचाच शब्दबध्द पाऊस म्हणजे भीज गाणी पावसांचंआगमन होताच ही गाणी पुन्हा पटलावर येतात प्रत्येक गाण गजरेसमोर एक वेगळं चित्र उभं करतं अशा काही गाण्याबाबत थोडसं.

-प्रशांत दैठणकर

पावसाचं आगमन होताच निसर्गाला आणि मनाला उभारी येते वैशाख वणव्यात झालेली होरपळ विसरुन सारे जण नव्यानं आयुष्याचा अंकुर येण्याची वाट बघायला लागतात शेतकरी विशेष करुन आपल्याकडे याची वाट बघतो असं म्हटलं तरी प्रत्येक सजीवाला या मेघाच्या बरसण्याची वाट असते.

पाऊस म्हटल की थेंब थेंब आयुष्य त्या प्रत्येक थेंबात भावभावना आणि आशेचा पूर पावसासोबतच प्रेम जीव साद घालतात त्या प्रेमाच्या पावसाळी कविता आणि प्रेमावरील पावसाळी गाणी हिंदी चित्रपट सृष्टी असो की मरीठी दोन्हीमध्ये अशी पावसाळी गाणी आणि त्याची परंपरा आहे.

श्रावणात घननिळा बरसला...!

हे घनगंभीर आवाजातल पावसाचं लतादिदीनी गायलेल गाणं कोणत्याही ऋतूत आपल्या समोर त्या निळया बरसणारे घन अर्थात मेघ आणि त्यामुळे चिंब झालेला आणि हिरवाईनं लगडलेला सण उत्सवांचा श्रावण समोर आणतो.

आला आला वारा.. संगे पावसाच्या धारा

आठवणी करा सया निघाल्या सासुरा

अवखळ आणि अल्लड वयात विवाह झालेला त्या मैत्रीणी त्यांच माहेर सोडताना ते सोसाटयाच्या वा-यासह पावसानं येणं पुन्हा बालपण जाग करायला लावणं हे शब्दचिंब बोल.

हिंदी चित्रपटामधून राजकपूर, मनोजकुमार तसेच सुभाष घई, फिरोज खान यांनी चित्रपट निर्मितीत या पावसाला खास स्थान दिलेल आपल्याला दिसेल त्यात मला मनोज कुमारची गाणी अधिक चांगली वाटतात तारुण्यात प्रित रंगताना एका बाजूला ती आणि दुस-या बाजूला नोकरी यात भावना अडकून बसलेला बेरोजगार तरुण मनोज कुमारने रोटी कपडा और मकान या चित्रपटात साकारला मस्त पाऊस पडतोय आणि प्रेयसी सोबत आहे अशावेळी त्याला चिंता आहे मी नोकरीची त्याला वैतागून झीनत अमान त्याच्या नोकरीतला तुच्छपणा सांगते लता दिदींनी हे गाणं गायलय.

अरे हाय हाय ये मजबूरी

ये मौसम और ये दूरी

मुझे पल पल है तडपाये

तेरी दो टकियांदी नौकरीमे

मेरा लाखोंका सावन जायॅ

लाखेंका सावन अशी संकल्पना असणांर हे पावसाळी गाणं अशा प्रकारच्या गाण्यामध्ये अव्वल ठरणांर आहे.

जिंदगीकी ना टूटे लडी

प्यार करलें घडी दो घडी

अशा खर्जातल्या आवाजात नितीन मुकेश आणि लतादिदींच हे गाण क्रांती चित्रपटातल आहे नायक आणि नायिका दोघेही जहाजावर जखडलेल्या अवस्थेत आहेत आणि वरुन पाऊस पडतोय दुरवर नजर जाईल तिथवर, समुद्र सारं जलमय असणारं गाणं आयुष्याचा एक वेगळा अर्थ सांगतं ते या वाक्यामधून

उन आखोंका हसना भी क्या

जिन आखोंमे पानी ना हो

सुंदर अशी कविकल्पना गाण्यातल्या या ओळीत आली आहे.

मुंबई आणि कामगारांची आदोंलंन, उपोषण असा काही काळ मुंबईनं बघितलाय याच पार्श्वभूमीवरचं मनोज कुमारचं आणखी एक पावसाळी गीत म्हणजे

पानी रे पानी तेरा रंग कैसा.. !

हिंदी चित्रपटांमध्ये पावासावर गाजलेली भरपूर गाणी आहेत आर्त आवाजात -हदयातल्या भावना मोकळया करीत किशोर कुमारने आपल्या प्रेमाचं केलेल वर्णन अर्थात

मेरे नयना.. सावन भादो

फिरभी मेरा मन प्यासा

त्याच प्रकारे विरहाची किनार जपत सुरेश वाडकरांनी नायिकेविणा रहावं लागलेल्या विनोद खन्नाची प्रेममय पावसाळी विरहवेदना गायली आहे चांदनी चित्रपटातलं हे गीत आहे.

लगी आजा सावन की

फिर वो झडी है.. !

वही आग सिने में

फिर जल पडी है.. !

पावसात नायिकेची छेडछाड करणारी काही अप्रतिम गाणी आहेत त्यात किशोर कुमार यांच्या चलतीका नाम गाडी मधलं गाणं अव्वल आहे. नायक किशोर कुमार गॅरेज मेकॅनिक आणि पावसाळी रात्री बंद गाडी दुरुस्तीला आणताना भिजलेली नायिका मधुबाला हे गीत किशोर कुमारनं गायलं आहे.

No comments: