Monday 12 December 2011

आई...!












तिच्या बाबत काय लिहावं..
ती सार होती आयुष्याचा..
ती आधार होती जीवनाचा..
ती एक विश्वच होती..
ती विश्वास होती..
मला जन्म देणारी..
जन्माआधी ९ महिने..
ती माझा श्वास होती..
ती माता.. ती मंदीर होती..
आहोत तोवर हे जग..
हेच तिनं शिकवल..
त्याच तिच्या बोलांवर..
चालतोय तिच्या पावलांवर..
आठ वर्षे आठवणींची..
जाणवत राहतं मला सतत..
ती गेली ते फक्त देहानं..
मनानं ती आजही इथं आसपास..
रात्री मायेनं फिरणारा एक हात..
पाऊस पाझरतो.. या मनात..
तीचं नसणं आता सवयीचं..
चालावच लागणार इथं
शो मस्ट गो ऑन..

ती.. तिची माया अपार...
रात्री न कंटाळता ३ वाजता
गरम जेवण बनवून देणं..
आता कधी इच्छाच न राहली..
तिच्यासोबत ती मायाही गेली..
ती प्रेमाचं ते आगर..
ती वात्सल्याचा असीम सागर..
ओंजळच माझी तोकडी..
आणि रितीच राहिली घागर..
ती आई.. तीच घर..
तीचे वाट बघणारे ते डोळे..
आजही.. याद आहे तिची..
अन् तेच आता बाकी...
आयुष्यात येणं- जाणं..
चालू राहणार हा जमाखर्च..
बेरीज केली नाती.. खरी.. खोटी
ती गेली कायमची...
करून कोरी आयुष्याची पाटी..

प्रशांत १२-१२-११

No comments: