Tuesday 25 June 2019

निस्ताच टैम्पास......


आजकाल आपण काय करतो असं विचारलं तर एकच सांगता येईल आजकाल आपणाकडे अधिकाधिक जण Time pass करतो.. यह मै नही कहता तर सारी आकडेवारी तेच दाखवत आहे. Candy Crush नावाचा एक मोबाईल गेम माझ्याकडे आहे. आज फारा दिवसांनी काही रिकामा वेळ होता म्हणून गेम खेळायला लागलो आणि मोठ्या मुष्किलीने त्याची एक लेव्हल पार केली आणि पुढची स्क्रीन पाहून धक्काच बसला.. यात रविवार ते रविवार लेव्हलचे आकडे येतात.. एक महिला आठच दिवसात 457
लेव्हल पार करून आघाडीवर असल्याचं तिथं दिसलं... इतका रिकामा वेळ असतो का लोकांकडे असा सवाल मनात आला. तसं रिकामा वेळ असणा-यांची आपल्याकडे कमतरताच नाही हे जाणवलं...

ये देश है वीर जवानोंका....

असं गाणं लहानपणी ऐकलं होतं आता ये देश है मोबाईलवालोंका अन् टैमपास करने वालोंका असं क्षणभर वाटलं... त्यातच आज एका वृत्तपत्रात उसंडू अर्थात उपसंपादकाची एक डुलकी वाचण्या आली आजचे भविष्य लिहिताना टायपिंगच्या चुकीने वेळेचा दुरूपयोग करा असं छापून आलय... लो कल्लो बात..

आपल्या देशात सर्वाधिक वेळ हा निवडणुकांच्या चर्चेत जातो असा एक अनूभव आहे आणि ग्रामीण भागात तर तो सा-यांचा आवडता छंद आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. ग्रामीण भागात आधी चावडीवर गप्पा चालत असत... आता गाव तिथं एसटी आल्यानं गप्पांची जागा बदलून ती आता एसटीच्या स्टॅंडवर सरकली आहे. त्यात मोबाईल तंत्रज्ञानाच्या विकासाने आता सा-यांना ई-चावडी आता खुली केली आहे. मोबाईलच्या मदतीने सकाळी
रांगोळी काढणारे हात आता मोबाईलच्या पॅटर्न लॉक आधी उघडतात आणि दिवस नंतर सुरू होतो असा अनुभव येत आहे.

Whatsapp वर सकाळी संदेशांचा रतीब सुरू होतो तो रात्री झोपेपर्यंत चालू राहतो. यातील अधिक संदेश न वाचताच पुढे ढकललेले आपणास दिसतील. ज्याचा जसा Net pack तसा त्याचा वापर कमी अधिक होताना दिसत होता मात्र आता 4G Technology आल्यानंतर ते बंधनही राहिलेले आपणास दिसत नाही त्यात भरीस भर म्हणून आता TikTok धुमाकूळ घालताना दिसत आहे. यात चित्रविचित्र क्लीप बनवायच्या आणि त्या Forward करायची याची स्पर्धा आपण बघत आहोत. याचं Fad इतकं वाढलं की यावर बंदी आणण्याबाबत विचार व्हावा असं मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे.

या सर्व माध्यमांचा वापर आपण सर्जनशीलतेसाठी केला तर ते समजण्यासारखं आहे मात्र यातून सामाजिक तेढ निर्माण झाल्याचे देखील काही प्रकार घडले आहेत फेसबूक सारख्या माध्यमाच्या गैरवापराने काही ठिकाणी दंगलीच्या घटनादेखील घडल्या हा प्रकार अतिशय गंभीरच म्हणावा असा आहे. व्यक्त होण्यासाठीचे कोणतेही साधन हे दुधारी तलवारीसारखे असते त्याचा वापर करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत हे नक्की. आपण इतके रिकामटेकडे आहोत का याचा देखील आपण विचार या निमित्तानं करणं गरजेचं आहे.

आपली युवाशक्ती सकारात्मक कामात वापरली गेली तर खुप काही बदल आपण घडवू शकतो यावर आपला विश्वास असायलाच हवा.

रिकामपण लाभत नाही अशांच्या रांगेत
आपण बसावं तर तिथं देखील हे मेसेजवीर बसू देत नाहीत. त्यांच्या पोश्टी आणि त्यातल्या गोष्टी कधीच संपत नाहीत ही स्थिती आहे. त्यातही नको त्या व्हिडीओ टाकणा-यांनी आणलेला तो वैताग वेगळाच. कधी कधी तर वाटतं की मोबाईल आपल्यासाठी आहे की आपण मोबाईलसाठी.

हातात जग आलय हे खरं परंतु त्याचा चांगला फेरफटका घेण्यापेक्षा YOUTUBE वर वेळ घालवणारे सर्वाधिक दिसतात. तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हा अखेर ज्याचा त्याचा सवाल आहे मात्र त्याचा वापर विधायक होतो की नाही यावर किमान पालकांचे लक्ष असले पाहिजे.
आता PUBG त वेळ घालवायला सा-यांनाच आवडेल मात्र आपण स्क्रीन टाइमची मर्यादा देखील जपली पाहिजे ना...

फेसबूकचे पडीक अशा पिढी नव्याने पुढे येत आहे. काही मिनिटांनी आपसूक नजर आणि हात मोबाईलकडे जाणारी पिढी पाहून हा उत्क्रांतीचा नवा टप्पा तर नाही ना असाही सवाल पडतो.
डार्वीनच्या सिद्धांतानुसार आपलं शेपूट नावाचा अवयव काळाच्या ओघात संपला असं म्हणावं तर आता मोबाईलच्या रूपानं नवा अवयव आला आहे असे म्हणायला हरकत नसावी. आणि या युगाचा हा नवा अवयव असं म्हणत याला मान्यता देण्याची वेळही लवकरच येईल असे दिसते.

प्रशांत दैठणकर

982319466

2 comments:

Anirudha Ashtaputre said...

असं असलं तरी बऱ्याच ज्येष्ठांनी स्मार्ट फोनला आपलेसे करून त्यांचे एरव्ही कंटाळवाणे आणि रटाळ झालेले जीवन सुसह्य केले आहे हे तितकंच खरं आहे
अनिरुद्ध अष्टपुत्रे

Prashant Anant Daithankar said...

Well said & it is very true...Boss...!

#prashantdaithankar