Saturday 10 September 2011

व्यक्त किती..?... अव्यक्त


आज आयुष्यात काय हवे आपणाला असा सवाल आपण रोज मनाला विचारावा असे वाटते. कारण याचं तंत्र रोज बदलताना दिसते. काही काळापूर्वी आपण काय होतो आणि आज काय आहोत याचाही आपण आढावा घेतला पाहिजे. काळ झपाट्याने बदलत आहे आणि त्याची ही गती कायमच राहणार आहे यात शंका नाही. श्रीकृष्णाने संदेश दिला.. परीवर्तन ही संसार का नियम है.. आपण वाचतो... कळतं.. पण वळत नाही..
     
सारी आशा सारी स्वप्ने..
      एका छोट्याशा मनातली
      कुणी मला का गावे..
      का मी कुणा सांगावे..

      का घडते हे सारे समजे ना
      भाव मनाची काही उमजेना
      आज धावताना या जगात
      मन मात्र धावे आकाशात

      आशेचा हा लांबलेला दोर
      त्याला कारूण्याची किनार
      का मी आहे या जगात..
      प्रश्न रोज नव्याने मनात
     
      तिचा तो रोजचा त्रागा
      वैतागाची नशिबी जागा
      राग हा सरता सरेना..
      मन उदास.. भरता भरेना
     
      शब्दांचे शर कधी हो झाले
      नजरेतही काटे मग आले
      तीर फेकायाला नाही धीर
      अन् झेलाया हा माझा ऊर
     
      का म्हणूनी उशिर हा झाला
      नवा प्रश्न अधिर या मनाला
      आता कुठले जीव   न..गाणे ?
            उठता मैफल.. रूसले तराणे..
     
      आणि आयुष्याच्या हा न कळलेला प्रवास असाच चालू ठेवावा म्हणत किती जण चालत असतात आणि किती जण नेमकपणाने जगत असतात.. आकडा दाखवता येईल.. प्रगतीचं भौतिक मापही मांडता येईल..आतल्या जखमा किती जणांना मांडता येतात.. शब्दात घेऊन भावना मोकळेपणानं किती जणांना सांडता येतात.. असे हे जीव मग पुस्तकात आपली प्रतिमा शोधत त्या प्रतिमेच्या आड आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून देतात..
     


      व्यक्त किती..?... अव्यक्त..
      मनाची सारी ही आसक्ती
      मनच या सा-या चिंतेचे कारण..
      कारण किती..? ..  विनाकारण

      चालत राहतात ध्येय्य मानून नसण-या बाबींना आणि आयुष्याच्या एखाद्या वळणावर जाणवत अरे जगायचच राहून गेलं.. जरी त्या जगाला वाटत असतं की काय मस्त जगलाय हा... हा मात्र आतून कोराच असतो.. पेन्सीलने लिहून कुणी पाटीवरली अक्षरे मिटवावीत तसं याची पाटी कोरीच असते..
                        याची पाटी कोरीच असते..!
याची पाटी कोरीच असते..!
           
PRASHANT    10.09.11    SATURDAY

No comments: