मेघा रे मेघा रे . . . .
. आज तू प्रेम का संदेस. . .
जितेंद्रच्या सिनेमातलं लहानपणी ऐकलेलं गांण . त्यावेळी कल्पनाच नव्हती हे काय आहे. गाण्याचे बोल कळले नाहीत पण गांण त्यावेळी वाजायचं. . . तबकडयांचा काळ होता तो. . . तबकडया अर्थात ग्रामोफोन त्यावर पैठणगेटच्या आसपास असणाऱ्या हॉटेल्समधून अनेकदा गाण्याचे सूर कानावर पडायचे आणि या तबकडयांमधील गाण्यांसाठी हॉटेंल्स मध्ये गर्दी रहायची .
गाण्यांसाठी
त्याकाळी आणखी एक पर्याय उपलब्ध् होता तो म्हणजे रेडिओचा. . . . अर्थात त्या काळी तो एकच टाइमपास उपलब्ध होता सर्वांसाठी . . . टिव्ही खूप उशिराने आला आणि बघायला मिळाला. . . . शाळेत असताना कानावर पडलेले ते शब्द आपण जगणार आहोत याची जरा देखील कल्पना नव्हती.
त्यानंतर अनेक पावसाळे आले. . . पाहिले . . . जगलो . . .भिजलो. . . धूंद झालो . . प्रवास आजवर सुरुच आहे. पण गेल्या काही काळापासून यात फरक पडलाय. . . जूलै 2009 मध्ये मी विदर्भात आलो आणि आजपर्यंत इथं आहे. . . उद्याचं माहिती नाही. . . आल्या दिवसापासून त्यावेळचा पाऊस आणि आजचा पाऊस . . . तब्बल 9 वर्षे झालीत . . या काळात निसर्गाची अनेक रुंप बघितली . . इथला पाऊस बघितला इथल्या पावसात भिजलो . . काही काळ इथल्या पावसात रमलो . . . पण आठवत राहिला ती माझा तारुण्यातला पाऊस ...!
या विदर्भाचं एक वैशिष्टय आहे ते म्हणजे इथलं सौंदर्य . . .
जगात सर्वात सुंदर युवती कोठे आहेत असं विचारलं तर माझं उत्तर विदर्भ हेच आहे . . . विदर्भ कन्यांचं सौंदर्य खरोखर शब्दातीत असं आहे . . पुराणात देखील याचे दाखले आपणास सापडतात . . . विदर्भाचा राजा नल याची पत्नी दमयंती असो की प्रभू श्री कृष्णाची पत्नी रुक्मीणी या विदर्भातल्याच होत्या . . . !
रोमांच आणि रोमांस . . . हा पावसाचा खास परिणाम असतो . . . अन् इथं एकटेपणात 9 पावसाळे काढताना आठवतात त्या बालपणी कानावर पडलेल्या गाण्यांच्या
ओळी मेघा रे . . . मेघा रे . .
भविष्य . . . वर्तमान आणि भूतकाळ यात मन फिरायला लागतं ही आंदोलनं अधिक गतिमान होतात ती आकाशात मेघांनी गर्दी केल्यावर . .
अक्सर बारिश लाती है प्यार का मौसम . .
और गम की आज दूर है तुम और हम . .
पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा अंगणात पडत असला तरी तो मनाला चिंब करीत असतो.
पावसात सौंदर्य अधिकच खूलत आणि ते जितंक खुलत तितकं मनाला त्रास देत असतं . . कदाचित कालीदासात आणि माझ्यात हाच एक धागा असेल भावनेचा त्याला नाकारण्यात आलं होतं आणि मला स्विकारण्यात आलं . . इतकाच काय तो फरक परंतु भावनांचं काय . .?
प्रेमाची भावना जितकी अधिक त्याच्या कैक पटीत विरहाची भावना मनाला असते . . . अगदी अपरिहार्य म्हणून विरह सहन करायचा . . . मग कालीदास . . . ते मेघ आणि . . . मेघदूत विरह की सजा . . प्रश्न आणि पाऊस पडताना प्रत्येक सरी सोबत प्रश्न माझ्या अंगणात उतरतो . . .
मनात घर करतो पडणारी प्रत्येक सर . . त्या क्षणांची आठवण़ जागवणारी असते . . . पावसाचा प्रत्येक थेंब . . . भावनांनी चिंब होत जाणारं मन आणि चिंब चिंब होणारा देह . . . तो बाहेरच्या अंगणात बरसत असतो आणि मनाच्या गाभाऱ्यात भावनांचा पूर दाटलेला असतो . . . एखादया गाफील क्षणी मग हो पूर डोळयांची कवाडं लोटून बाहेर पडतो . . . ताल असतो ओठांमधून कोंडून ठेवलेल्या हुंदक्यांचा .
आषाढस्य . . सृष्टी सजली आतापर्यंतच्या पावसाने . . . ग्रीष्मात तापलेली धरणी वर्षा त्रृतूच्या आगमनाने तृप्त होण्याचा हा काळ . . धरतीनं हिरवाई ल्याली . . . त्यात आसपासच्या डोंगरांवर मेघांचे आवरण आणि त्या धरतीच्या हिरवाईवर पहाटभर पसरलेली धुक्याची दुलई . . . ज्या क्षणांना तू माझ्यासवे अन् मी तुझ्या सवे या पाऊस धारांना मोती समजून वेचलं त्या क्षणांची . .
ते क्षण . . . ते दिवस भारलेले . . मंतरलेले . .
- प्रशांत दैठणकर
9823199466
2 comments:
Sir realy good blog,and we realy miss u in gadchiroli
May be i ll go to wardha or nagpur by transfer this yr , but i ll come to meet u before i leave gadchiroli....
Post a Comment